प्रसंग तसा बाका होता, वातावरण तप्त होते
शांततेची चिन्हे दिसेनात, एकसतत आक्रमण सुरू होते
घड्याळाचे का काटे रुतले होते? वेळच पुढे सरकेना
आम्हा दीनांचा तो कैवारी, धावा करुनही येईना
आदल्या जन्मीचा सूड की या जन्मीची परीक्षा होती?
प्रसंगाची काठिण्यपातळी exponentially वाढतच होती
अखेर आमचा धावा ऐकून तो शांतिदूत ठणाणा करित आला
पाचची बेल झाली न आक्रमक "काही झालेच नाही" या अविर्भावात वर्गातून निघुन गेला
-निखिल अनिल जोशी
नादखुला....
ReplyDelete