Thursday, May 19, 2011

कोप

आयुष्याच्या माझ्या रणि, सर्व पापांचा मी धनी
कधी काही होते माझे, आता फक्त आठवण

बेभान हा धुंद वारा, वादळाचा हा नजारा
धन गेले मन मेले, नुरे आशेचा किरण

भूकंपाचा अनुकंपा, विनाशाचा वाजे डंका
वाट झाली वाकडी नि रेंगाळले दोन क्षण

त्सुनामीची उंच झेप, निसर्गाचा हा उद्रेक
शान मातीमोल झाली, जीव फिरे रानरान

निसर्गाचा कोप झाला, आयुष्यावर रोष झाला
चूल मूल सर्व गेले, भटकंती वणवण

कोणाविन कोण अडे, रोज मरे कोण रडे
आता नाही घरदार, शोधतो विसावा पण


-निखिल अनिल जोशी
१६-०३-२००५
पुणे

No comments:

Post a Comment